महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

अश्या मुलींना जर आईची वेदना कळत नसेल तर आपल्यासाठी मेली म्हणून समजायच...तिने सगळ्यांसमोर जन्मदिलेल्या आईची मान खाली पाडली ... सतिश(भाऊ)साबळे

लहानपणीची , घरच्या गोठ्यातल वासरू दगवल्यावर किंवा विकल गेल्यावर गायीची होणारी घालमेल आठवली
अश्या मुलींना जर आईची वेदना कळत नसेल तर आपल्यासाठी मेली म्हणून समजायच...तिने सगळ्यांसमोर जन्मदिलेल्या आईची मान खाली पाडली ... सतिश(भाऊ)साबळे
February 21, 2026 09:27 PM ago Baramati, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मिडिया आज कोर्टाच्या आवारात जिवाच्या आकांताने रडणारी आई पाहून काळजात वेदना उठल्या , , नवऱ्या शिवाय भारतीय समाजजीवनात एखादी स्त्री आपल्या लहान मुलांना घेऊन जगताना तिच्या वाट्याला कोणत्या पातळीवर संघर्ष येतो याची कल्पना सर्वानाच असते , , लहानपणीची , घरच्या गोठ्यातल वासरू दगवल्यावर किंवा विकल गेल्यावर गायीची होणारी घालमेल आठवली , , कायदा काय म्हणतो , व्यक्ती स्वतंत्र , संविधानिक हक्क , ठराविक वया नंतर माणस मोठी होतात आणि स्वतःला योग्य ते निर्णय घेऊ शकतात वैगेरे एका बाजूला आहेत , आणि आयुष्याचे खरे प्रश्न नात्यामधील ओलावा , बंधन , आणि सामाजिक प्रतिष्ठा दुसऱ्या बाजूला आहेत , आपल्या सामाजिक जीवनाचा ब्यालन्स टिकून रहावा म्हणून काही नियम बनवले गेले काळाच्या ओघात टप्प्या टप्प्यावर त्यात बदल होत गेलेत पण , , मुलांनी आईबापाला एका रात्रीत सोडून द्याव , एका क्षणात त्यांना आईबापा पासून जीवाला धोका आहे म्हणून त्यांच्यावर आरोप करून आईबापला स्वतःच्या असण्याची लाज निर्माण करून द्यावी हे खूपच अमानवी आहे ,


कुणी कुणाबरोबर लग्न करावं यावर कसलं ही कायदेशीर बंधन आपल्याकडे नाही , , , नसावं ही , पण आई बापाच्या संमती शिवाय त्यांना काडीची किंमत न देता एखाद्या माणसा बरोबर निघून जावं हे ही खूप क्लिष्ट आणि एकेरी गोष्ट आहे , ज्यांच्या घरातील मुली निघून जातात ती कुटुंब हळूहळू आतल्याआत मरताना पहिलीत मी , , स्वतःच्या आई बाप , भाऊ आणि इतर कुटुंबाला मूल सोडून देतात आणि मग अशी माणसं ही स्वतःच स्वतःला दोष देत आयुष्य काढत राहतात , खरतर कोणी ही त्यांना स्पष्ट काही म्हणत नाही पण या माणसांचा समाज जीवनाचा धागा उसवला जातो त्यांना पुन्हा कधीच खर खर खळखळून हसायला येत नाही , कुणाच्या लग्नात नाचता येत नाही , कुणाच्या खांद्यावर बसून शड्डू ठोकता येत नाही की , पुढं होऊन कुणाचं लग्न जमवता येत नाही , मनासारखं जगता येत नाही , एका मागे एक मानसिक दुःखाच्या लाटा येत राहतात आयुष्यभर , ,


आपण लक्षात घेतलं पाहिजे , धर्माच्या पलीकडे गेलं पाहिजे , जातीअंताची चळवळ , किंवा सामाजिक सुधारणा वैगेरे दुःख पेरण्यासाठी नसतात , त्या दुःख वेचण्यासाठी असतात , भिगवण प्रकरणात या पोरींने उचललेले पाऊल मला व्यक्तीशः मनापासून आवडलेले नाही आपल्या आईचा हंबरडा तिला ऐकू येत नसेल तर किती भावनाशून्य झालो आहोत आपण याचा विचार केला पाहिजे ,

संबधित बातम्या